"एखादी खोलवर झालेली जखम , वेदनेचा आकंत करणारी जखम , आर्त किंकाळी फोडायला लावणारी जखम . आणि अशा जखमेवर हळुवार मारलेली फुंकर . ती फुंकर हवीहवीशी वाटणारी , पण क्षणभंगुर , वेदनेचा विसर पाडणारा त्यातला आपलेपणा ." " माणसाचे आयुष्य अगदी असेच, त्या दुखऱ्या जखमेसारखे.ज्याप्रमाणे ती जखम नकोशी असते तसेच आपले आयुष्य हि आपल्याला बऱ्याचदा नकोसे होते. अशा वेळेस सगळ्या सुखांचा उबग येतो , वीट येतो.तेव्हा गरज असते ती आपल्या कोणाची तरी. मग ती व्यक्ती आपली आई,वडील,मित्र-मैत्रीण,आणि बऱ्याचदा प्रेयसी-प्रियकर कोणीही असते.त्यांच्या सहवासासाठी मन मोहरून जाते." " एख्याद्याचा लागलेला लळा,एख्याद्याची झालेली सवय,तो तुटताना अनेकदा नरकयातना होतात.ज्यांच्या अंगाखांद्यावर आपले अवघे बालपण जाते,त्यांच्या पासून विभक्त होताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपण बऱ्याचदा पाहतो.मी सुद्धा पाहिले.पण मी ज्या वेळेला ते पाहिले त्यावेळेस माझे मन अगदीच कोवळे म्हणजे ९ वर्षांचे होते.पण त्या वेळेस सुद्धा ना मी डोळ्यातून पाण्याचा एक थेंब येऊ दिला,ना एक हुंदक
जागवू मराठी , फुलवू मराठी , घडवू नव्या युगाची मराठी