Skip to main content

"एका स्वाधीन झालेल्या मनाची गोष्ट..."


 "एखादी खोलवर झालेली जखम ,
     वेदनेचा आकंत करणारी जखम ,
       आर्त किंकाळी फोडायला लावणारी जखम .
         आणि अशा जखमेवर हळुवार मारलेली फुंकर .
           ती फुंकर हवीहवीशी वाटणारी , पण क्षणभंगुर ,
             वेदनेचा  विसर पाडणारा त्यातला आपलेपणा ."
 " माणसाचे आयुष्य अगदी असेच, त्या दुखऱ्या जखमेसारखे.ज्याप्रमाणे ती जखम नकोशी असते तसेच आपले आयुष्य हि आपल्याला बऱ्याचदा नकोसे होते. अशा वेळेस सगळ्या सुखांचा उबग येतो , वीट येतो.तेव्हा गरज असते ती आपल्या कोणाची तरी. मग ती व्यक्ती आपली आई,वडील,मित्र-मैत्रीण,आणि बऱ्याचदा प्रेयसी-प्रियकर कोणीही असते.त्यांच्या सहवासासाठी मन मोहरून जाते."
  " एख्याद्याचा लागलेला लळा,एख्याद्याची झालेली सवय,तो तुटताना अनेकदा नरकयातना होतात.ज्यांच्या अंगाखांद्यावर आपले  अवघे बालपण जाते,त्यांच्या पासून विभक्त होताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपण बऱ्याचदा पाहतो.मी सुद्धा पाहिले.पण मी ज्या वेळेला ते पाहिले त्यावेळेस माझे मन अगदीच कोवळे म्हणजे ९ वर्षांचे होते.पण त्या वेळेस सुद्धा ना मी डोळ्यातून पाण्याचा एक थेंब येऊ दिला,ना एक हुंदका येऊ दिला.नंतरच्या आयुष्यात खूप जणांचे दूर जाने मी अनुभवले. अर्थात करणे वेग वेगळी होती.त्यातले काही अंतराने दूर पण मनाने जवळ,तर काही जवळ असूनही मन नाही समजू शकले.आणि हो काही व्यक्ती तर परत कधी न येण्यासाठीच निघून गेल्या."
 " सुख दुखाचे अनेक उन्हाळे पावसाळे आपण सगळेच पाहतो.जीवन जगताना संकटे सर करत प्रत्येक जण जात असतो . या प्रवासात आपण कोणाला , तर कोणीतरी आपल्याला मायेचा हात देतो.दुखाचे कारण एवढेच कि आपल्या हातातील माया ज्याला दिलाय त्याला काळात नाही , तर कधी कधी आपल्याला मिळालेल्या हातातील मायेचा ओलावा आपल्यालाच कळत नाही. जाणते अजाणते पणात आपणच कुठल्या तरी खोलवर झालेल्या जखमेचे कारण असतो, तर कधी कोणीतरी आपलेच आपल्या मनावर जखमेचे घाव करून जातात.अशा जखमा होतात कारण त्यांच्या अस्तित्वाला मन मोहरून स्वाधीन होतं.
" आयुष्य असं का असतं?"                                                             
                                  ---माधव वणवे

Comments

Popular posts from this blog

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिव...

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या...

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...