Skip to main content

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

 


"झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..."




"माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे.
असोत.
पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती.
अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्याखाली असलेले “इंदोर” फार काही वेगळे जाणवत नव्हते.पोहे आणि जिलेबीचा एक आगळा वेगळा नष्ट येथे मिळतो.बरेच ऐकले होते म्हणून पोटपूजा केली.आणि बस मध्ये बसायला जाऊ लागलो.
बसमध्ये चढलो आणि त्याक्षणी मला दोन गोष्टींची प्रचीती “याची देही याची डोळा” आली.एक म्हणजे पहाटेची स्वप्न नेहमी खरी होतात.आणि दुसरा म्हणजे “स्त्री च्या सौन्दर्यावर्ती निरागसतेची झालर असते. हो,एक चंद्रासारखा चेहरा बस मध्ये होता.बघावा आणि बघताच राहावा , इतका सुंदर, जणू काही अप्सरा अवतरली असावी.
कोण होती ,कुठली होती , काही माहिती नव्हते.पण ज्या चंदेरी स्वप्नांमध्ये ज्या अनाम चेहऱ्याची मला आस लागलीये तो अनाम चेहरा हाच तर नव्हे? असा एक भाबडा प्रश्न माझ्या हृदयावर मोरपिसे फिरवून गेला.
बस धावू लागली.प्रवास लांबचा होता.मनात निश्चय दृढ होता , संभ्रम होता , उत्सुकता होती.एक मात्र खरा माझ्या लोखंडी हृदयाला तिच्या चेहऱ्याच्या चुम्बकाने खेचून घेतले होते .मराठी कवितेतील शृंगार रसामध्ये रमणारा मी , त्या रसांच्या कारंजा मध्ये चिंब भिजत असताना त्यांच्या संघातील काही उपट सुंभ मुलांनी  महाराणा प्रताप यांच्या नावाने जयघोष सुरु केला.घोषणाबाजी केली.त्याने डिवचला गेलेला माझ्यासारखा मराठी पोरगा मात्र ती पण घोषणा देतेय हे पाहून शांत बसला.कळले, कि ती राजस्थानची होती.
अर्थात पुणेरी सभ्यता म्हणून आम्ही शांतता पाळली पण जेव्हा आम्हाला डिवचण्यासाठी असले धंधे सुरु आहेत हे कळला तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून घुमलेला “ जय भवानी , जय शिवाजी “ चा नारा मात्र नंतर गगनभेदी ठरला.नंतर दिवस कसा गेला हे कळले नाही.संध्याकाळी होटेल कडे परत जाताना त्याचा बसने , त्याच संघाबरोबर जायचे होते.जाताना शांत वातावरण होते.दिवसभर रखरखणारे उन आणि रात्री हवेत पसरलेला गारवा असे दुहेरी निसर्गाचे रूप बघावयास मिळत होते.
जेवणे आटोपून जमिनीला पाठ टेकली.आणि सुरु झाला दिवसभरात झालेल्या घटनांचा मागोवा.काही घटना इतक्या उत्कट कि डोळ्यासमोर तरळत होत्या.पहाटे पडलेले स्वप्न ,त्या स्वप्नाचा झालेला आभास , आणि त्याचा माझ्या भाबड्या मानाने सोईस्कर रित्या लावलेला अर्थ. अशा गोंधळात मी स्वतःला निद्रेच्या कवेत सोपवले.
नंतर २ दिवस अगदी असाच वेळ जायचा.तिला शोधण्यासाठी नजर भिरभिरत असे.स्पर्धाही एन रंगत येऊ लागली होती.धाकधूक , उमीद. जिंकण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात होती.
३ दिवस उलटले.त्यानंतर मला उलगडलेली ती....
ती...तिचे नाव.....शेक्सपियर ने म्हणाल्याप्रमाणे नावात काय आहे...नाही विचारले...
तिचे गाव....जयपूर राजस्थान...
[ मी तसा कडवा राजसमर्थक , पण साहेबांचे आदेश उ.प्र.,बिहार वाल्यांच्या विरोधात .म्हणून राजस्थानची हे बावनकशी लावण्यवती आचारसंहितेत बसतं हे पाहून तर आम्ही अजून खुश....]
अशाप्रकारे शेवटचा दिवस उजाडला.त्यांच्या संघाला दीड लाखाचे तर आमच्या संघाला दोन लाखांचे पारितोषिक मिळाले.प्रतेय्क जन थकलेला वाटत होता.परतीच्या प्रवासाची नांदीच होती म्हणा ती.बसकडे परतू लागलो.जड पावलाने.पण शेवटचे क्षण का होईना पण स्मृतीत साठवून ठेवण्यासारखे घालवायचे असा निश्चय मनाशी धरून बस मध्ये चढलो.
एकमेकांचे अभिनंदन करणे चालू होते.तिच्या पुढच्या बाकड्यावर बसलेल्या मी हिम्मत करून तिच्याशी बोलण्यासाठी शब्द उच्चारला...आमचे संभाषण थोडक्यात...
मी: “कोलेज का नाम क्या बताया आपने?”
ती: “टिंब टिंब....” (तिने काय सांगितले हे मला आठवत नाही.कारण तिच्याकडे पाहताना आणि ती मला उद्देशून काहीतरी बोलतेय हे हे दृश्य आयुष्याच्या अल्बम मध्ये कैद करण्यासाठी सारी ताकद माझ्या डोळ्यात एकवटलेली होती. आणि तिचे नाव थोडेच विचारले होते मी...मी विचारले होते तिच्या कॉलेजचे.ती सांगणार कॉलेजचे नाव.ज्याच्याशी मला काडीमात्र घेणे देणे नव्हते.मग कशाला ऐकू?)
मी: “तुम्हारी टीम कि सफलता में तुम्हारा क्या किरदार था?”
ती: “हमने ये किया , वो किया.....................”
मी: “वैसे तुम्हारी गाडी अच्छी ठी बहोत. अच्छी स्पीड थी.शुरुआत मैन तोह तुम पहले थे ..लेकिन बाद मैन क्या हो गया?”
ती: “ हमारी क्लच  प्लेट जल गयी..”
मी : “क्या? कैसे? क्लच प्लेट कैसे जल सकती हे?
[क्लच प्लेट लोखंडाची असते अशी माझी , एक यंत्र अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्याची समजूत होती.पण ती जळते म्हणजेच जळावू असते.याचा अंदाज बांधून पुढे काही न बोलता बुद्धी पाजळली नाही.]
या प्रश्नावर तिने बरेच स्पष्टीकरण दिले. बऱ्याच तांत्रिक गोष्टी होत्या.असेच आमचे संभाषण होत राहिले.ती बोलत राहिली मी पाहत होतो.नंतर धिंगा मस्ती सुरु झाली.
सगळे शांत झाले.....
आणि कानावर शब्द पडले.... “जय भवानी , जय शिवाजी...”.....आणि आवाज मागच्या बकाद्यावरून येत होता. हो मी किल्ला जिंकला होता.घोषणा ती देत होती.अर्थात गम्मत म्हणून का होईना पण तिच्या मुखातून ते शब्द वदवून घेतल्याचे समाधान माझ्या सारख्या सह्याद्रीच्या सिंहाच्या मनाला वाटले.
अशा रीतीने आम्ही काही जन चांगलेच परिचित झालो.आणि बस इंदोर शहरात थांबली. आणि काळजाचा ठोका चुकला.
तो एकाच कल्पनेने आणि एका कटू सत्याने कि पहाटे पाहिलेले स्वप्न , स्वप्नच राहणार होते.
अर्थ उरला नव्हता त्या स्वप्नाला.
“जसे स्वप्न ऐन रंगात असताना मोडल्याचे दुख होते, तसेच याहीवेळी झाले.
झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात.....आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात...”

माधव वणवे.....

Comments

  1. Madhav I have followed a song from an old film (Don't remember d name f film)..... U also start to follow.....

    The Song is : "Pardesiyon se na ankhiyan milanaaaa, Pardesiyon ko hai ek din jannaa...... Pardesiyon se na ankhiyan milanaaaaa........

    Sudhir....

    ReplyDelete
  2. sahhi re..........mastch story ahe

    ReplyDelete
  3. eeetki sundar hoti tar ashaa lavanyvatichaa phone number gyaaychaa na.....kaay yaar tu pan

    ReplyDelete
  4. saahhhiii......mastch....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"फुलपाखरू....."

माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं, मी सवयीने मुठ वळणार इतक्यात विश्वासानं ते हसलं,                      मी फुलपाखराला त्याचं नाव गाव पुसलं, स्वच्छंदी असं सांगून ते माझ्यातच रमलं, आपलेपणाची,अस्तित्वाची मला ते सवय लावून बसलं , काळाच्या काही घटकातंच तयासाठी मन वेडावलं, नेमेची येऊन त्याने प्रेमाचे बीज माझ्यात रोवलं, अन मग माझंही त्याच्याशी खूपच चांगलं जुळलं, कोणे एके दिवशी वाट पाहून थकलो , पण ते नाही फिरकून आलं, त्याच्या अस्तित्वाला शोधता शोधता माझं काळीज मात्र फाटलं....

ती ९० मिनिटे...

"पायावर पायाची टाकून घडी बसली होती अशी बसंतात बहरलेली वेल जशी चेहरा असा जसा खुललेलं नाजूक फुल, तेजानं उमललेलं डोळे असे पाणीदार जसे पहिल्या प्रहरी पानावर अवतरले दवबिंदू त्या दवांत शिरणारी सूर्याची पहिली किरणे, त्यातून उमटणारा लख्ख प्रकाश, तशीच हो अगदी तशीच तुझ्या काळ्याभोर केसांची लकाकी पहावं आणि पहातच राहावं, असा आरस्पानी चेहरा पेपर, "फ्रांस" सगळं काही क्षेम माहित नाही, बहुतेक यालाच म्हणत असतील पाहताक्षणी होते ते प्रेम..."