Skip to main content

"भ्रष्ट झाली मती, अरे कशी विसरता संस्कृती "

नववर्षाचे स्वागत धडाक्यात झाले .नेहमीप्रमाणे ३१ तारखेला तरुणाई सोमरस व तत्सम आनंदामध्ये डूम्बली होती.पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण दुसरे काय..बिघडलेली पिढी हा आजकालचा नेहमीचाच चर्चेचा विषय.हि चर्चा संस्कृतीचा ऱ्हास झाल्यावर थांबते कि काय कुणास ठाऊक.
मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात असे अनुभव येत आहेत कि जे खरेच विचार करायला लावणारे आहेत.
डीजे नाईट ला कपल पासेस ,तोकडे कपडे घालून मुलींचे फिरणे , हे सगळं तसा बघायला खूप मनोरंजक आणि बारा वाटतं .पण जरा विचार केला तर या गोष्टींचे गांभीर्य लक्षात येईल.कॉलेजच्या बाहेरील टपरीवर रोज पडणारा सिगारेट च्या काड्यांचा सडा हा नेहमी पाहण्यात असतो.कसरत करून शरीर कमवायच्या वयात हे शरीरात धूर घेऊन शरीर कसा जाळतात देव जाणे..
डीजे नाईट ला कपल पासेस आणि त्यांची निर्लज्जपणे जाहिरात करून प्रवेश फी ठेवणारे निर्लज्ज आयोजक आणि कहर म्हणजे असल्या गोष्टी महाविद्यालयात करण्यास परवानगी देणारे लोक.असा नंगानाच करून पाश्चात्य संस्कृती रुजवण्याचे कामजर शाळा महाविद्यालये करणार असतील तर मात्र बाब निश्चितच गंभीर आहे.
अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला कोणी पुढे सरसावत नाही.(आपण सिंगल एन्ट्री मारून नाचणाऱ्या पोरी बघू असाही क्रूर उद्द्येश विरोध न करण्यामागे असू शकतो म्हणा!!)
मागे एकदा M tv वर चुकून roadies चे एक दोन भाग पाहिले.बरेच ऐकले होते कि हा प्रसिद्ध कार्यक्रम आहे .पण पाहिल्यावर माझी खूप चिडचिड झाली.काय ती पोरं आन काय त्या पोरी.कमरेखालच्या विनोदाला फिदी फिदी हसणाऱ्या , कमरेखालच्या प्रश्नांना निर्लज्जपणे बिनधास्त उत्तरे देणाऱ्या पोरी पाहून मती गुंग झाली.(असलेच प्रश्न ते दोन टकले लोक त्यांच्या स्वतःच्या मातुश्री आणि भगिनींना विचारतील का हो?)
असला कार्यक्रम जिभल्या चाटत पाहणारी आमची पोरं आमच्या दादा कोंडकेंच्या चित्रपट व विनोदांना Cheap अशी लाखोली वाहतात.
असो काय करणार आपण तरी??
फक्त एवढेच म्हणू ,"भ्रष्ट झाली मती, अरे कशी विसरलात रे संस्कृती ?"

Comments

  1. अजून एक खंत वाटते ती म्हणजे अशा गोष्टीना विरोध करायला कोणी पुढे सरसावत नाही.(
    ^^^^
    साहेब असा विरोध करायला गेले कि लोक त्यांना जातीयवादी म्हणून हिणवतात किंवा त्याला 'cultural policing' असे म्हंटले जाते
    असो छान लिहिले आहेस .

    ReplyDelete
  2. Madhav , Lekh agadi chan Lihila .. mala orkutvarun tuzya blogcha address milala

    ReplyDelete
  3. raje tumhe kilee sar kara tumchay sathe khinde aamhe ladhvu

    ReplyDelete
  4. he sagle dhande north indian lokanche aahet.
    marathi muli asa kartana sahasa disat nahit.... ani jya thodyafar kartat tya aapli akkal gahaan taakun 'modern'panacha aav aananarya asatat.
    Ha north indian 'virus' ethalya mula mulinna laagu naye mhanun practically kaay karta yeil?????

    mazhyach babtitli ek gosht ahe...
    mazya class madhe ek north indian , convent type mulgi ahe. mi kadhihi mulinshi bolanyachya tar dur paahnyachya hi lafdyat nasto....
    ti bindhast mala cross kartana gaane mhanat jaate..... 'aap jaisa koi meri jindagi ...'

    3 vela zale ahe,mulagi ahe mhanun kahi bolalo nahi, next time kanakhali satkavlyashivay rahnaar nahi.....

    pan mazya jaagi ekhada innocent mulga asta tar?
    tya porinna fakt 'gammat' lagte....
    pan mul' aayushya guntvun bastat,barbaad hotat.

    ekhadi marathi mulagi khara prem asla tari swatahun bolel asa mala tari vatat nahhi....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

खग्रास

  एकविसावी फेरी पूर्णत्वास आली. शेवट उदास संध्येने होतोय. गेली एकवीस वर्षे या सूर्याभोवती घिरट्या घालताना खूप अनुभव आले. जीवनाच्या या आकाशगंगेत खूप तारे निखळले. उल्का बनून कोसळताना झालेल्या जखमा भारतील असं वाटत नाही. असं असलं तरी काही जन शुक्रतार्यासारखे नभांत सदैव लखाकत राहतील अशा ठिकाणी पोहोचले. या सर्व गोष्टी चंद्र बनून , जो कधी स्वयंभू नसतो बनून पाहत राहिलो. बरोबर अडीच वर्षांपूर्वी उचललेली लेखणी गेल्या आठ नऊ महिन्यांत अडगळीत पडली होती. धुळीचा एक गडद थर त्यावर साचला होता. आयुष्यात स्वावलंबन व स्थैर्य दिसत असल्याने म्हणता येईल किंवा समाजसेवेत लोटून दिल्याने म्हणता येईल विचारांना खत पाणी मिळालेच नव्हते. अडीच वर्षांचं झुडूप जणू कोमेजल परंतु बुंध्यात ओलावा असल्याने असेल कदाचित आज परत लिहायला सुरुवात करावी म्हणतोय. आपण दिवसभर कसं वागलो याच अवलोकन रात्री केल्याशिवाय चुकांचा मागमूस लागतच नाही. गांजाची धुरी बसलेला हत्ती जसा उन्मत्त पणे धावत सुटतो तशीच  अवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून माझी झालीये. मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहिला नाही म्हणून शिव...

"आयुष्य हे एक स्वप्न जणू...."

  " झोपेतले स्वप्न मोडल्यावर डोळे उघडतात...आणि जागतेपनीचे स्वप्न मोडल्यावर डोळेच नकोसे होतात..." "माझा इंदोर चा प्रवास, तसा खूप बाबतीत स्मरणीय ठरला.आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीच्या बाहेर पाय ठेवावा लागणार होता.त्या दिवशी साखर झोपेत असतानाच इंदोर नगरीत प्रवेश केला.प्रवास तसा चांगला झाला.आयुष्यातील एक सोनेरी स्वप्न या क्षणभंगुर डुलकी मध्ये पडले.पण ते मधेच ,मोडल्याने निराश झालो होतो.त्यावेळेस मला याची कल्पना नव्हती कि पहाटे पडलेले स्वप्न मी पुढच्या तीन चार दिवसात मी जगणार आहे. असोत. पहाटे पाचला निवासस्थानी पोहोचलो.आरमा करण्यास उसंत नव्हतीच.पुढचा प्रवास बाकी होता.बस थोड्याच वेळाने निघतील असा आयोजकांनी घोषित केले होते.ताजेतवाने होऊन बस कड निघालो.साधारण ७ ला बस निघेल असा त्यांनी सांगितला.हिंदुस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता पण त्याच बरोबर एक उमेद पण स्पष्ट दिसत होती. अशा गडबडीच्या वेळी नेहमीच स्वताच्या विश्वात रमणारा मी जरासा गोंधळलो होतो.महाराष्ट्राशी साधर्म्य साधणारे तसेच कोणे एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्या...

राष्ट्रपतींस मी लिहिलेले पत्र

आदरणीय प्रतिभाताई तुम्हास मेल करण्याचे कारण कि गेल्या आठवड्या भरात शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचे आराद्य दैवत मानतो आणि राजमाता जिजाऊ ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक स्त्री आदर्श घेते आपल्या पोटच्या पोराला तसे घडवण्याचा, यांच्यावर काहीबाही लिहून जो गदारोळ माजला आहे ते पाहून माझे मन फार सुन्न झाले. एक सच्चा शिवप्रेमी , एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून तथाकथित लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्यातून हा पत्रप्रपंच सुचला.अख्खा महाराष्ट्र दुखावला जाईल हे माहित असताना देखील कोर्टाने असा निर्णय दिला आणि आम्हा तमाम शिवप्रेमींच्या काळजावर सपासप वार केले. महोदया, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि याची तुम्हाला चांगली माहिती आहे कि शिवबा हा शब्द प्रत्येक मुलाच्या हृदयावर जन्मजात कोरलेला असतो. त्याच बरोबर हा काळा इतिहासही आम्हास शिकवला जातो कि मराठी माणसाला प्रत्येक वेळेस दिल्ली दरबारी मानहानीच स्वीकारावी लागलीय. स्वताला स्वयंसिद्ध शिवप्रेमी म्हणवणारे आणि महाराजांचे नाव घेऊन गळे फोडणारे अनेक आहेत या मातीत. काही आप्त स्वकीयांनी महाराजांना एका जातीपुरते मर्यादित करायचा प्रयत...