कधी कधी वाटत या जगापासून अलिप्त व्हाव ,
होऊनी अदृश्य तुझ्या श्वासा श्वासात रहाव,
श्रावणातील भ्रमराप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर जावं,
अन एकदाचं सूरवंट बनून तुझ्यात गुरफटून जावं ,
द्यावी श्वासांची आहुती , अन तुझ्या वाटेत रेशीम अंथरून जावं,
पण तू ठेवशील का ते रेशीमधागे जपून ?
जेव्हा होईल तुझ्या पायांना त्याचा मऊ मऊ स्पर्श ,
तेव्हा येईल न तुला माझी आठवण ?
ठेवशील ना जाण याची , तुझ्याखातर मी त्यागलं फुल पाखराच जिणं ...

Comments
Post a Comment